पिंपरी प्रतिनिधी:-
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करतांना स्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे व रास्ता खराब असल्यामुळे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने रस्त्यांचे दुरुस्ती करण्याची मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहे.त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकरात-लवकर शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतुक सेल पिं. चिं. शहर (जिल्हा) शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पा दौंडे, भरत मोहोड व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.































