वाघोली प्रतिनिधी: –
महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील केसनंद येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करुन दौऱ्यास सुरवात करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले. फटाके फोडून व ढोल-ताशा वाजवत यावेळी स्वागत करण्यात आले. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी उपसभापती मिलिंद हरगुडे, संरपंच प्रमोद हरगुडे, माजी सरपंच नितीन गावडे, माजी उपसंरपंच गणेश हरगुडे, दादासाहेब सातव, शाम गावडे, अनिल जाधव, माजी सरपंच संतोष हरगुडे, दभात्ता आबा हरगुडे, गणेश हरगुडे, राहुल हरगुडे, भाऊसाहेब शिंदे, उमेश हरगुडे, सतीश हरगुडे, निलेश हरगुडे, ज्योतीताई थोरात, संदीप भोंडवे, अनिल पासलकर, तुकाराम वाबळे, बाबासाहेब पासलकर, अनिल हरगुडे, दिलीप वाल्हेकर, निखिल नागवडे, शरद हरगुडे, दादा सातव, रमेश हरगुडे, रविंद्र कंद आदी महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ” केसनंद गावाशी माझा जुना संबंध आहे. ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. देशाचे भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे. अजित दादा आणि आदरणीय मोदीजी यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आपले असणारे प्रश्न मार्गी लागतील. मोदीजी यांनी बारा कोटी जनतेच्या खात्यात बहात्तर हजार कोटी रुपये जमा केले आहेत. मोदीजी हे विकासपुरुष आहेत. मला केलेले मतदान म्हणजे मोदीजी यांना केलेले मतदान होय. सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदीजी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या.
येणाऱ्या १३ तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.
आमदार मिलिंद हरगुडे यावेळी बोलताना म्हणाले, मागील पंधरा वर्षे ज्यावेळी दादा खासदार होते त्यावेळी दादांनी अनेक विकासकामे आपल्या परिसरात केली आहेत. दादांनी शब्द दिल्यास ते नक्की काम करतात. शिवाजी दादा तुम्हाला खासदार करण्यासाठी केसनंद गावातून उच्चांकी मतदान करणार. या निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड तुम्हाला देणार.