पिंपरी प्रतिनिधी:-
आजवर प्रेक्षकांनी अनेक सिनेमे पाहिले काही आपटले काही डोक्यावर घेतले पण काही तर एवढे डोक्यावर घेतले की आजच्या तरुण पिढीने खरंच त्या सिनेमातील नायकाचा आदर्श घ्यावा का…? असा प्रश्न उपस्थित होतो मग तो पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्याचा असो, चंदन तस्करी करणारा (खल) नायक असो किंवा तो सोन्याचा खाणींवर असो ज्यातून फक्त आणि फक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी निर्माण करावी हेच दाखवले गेले असे सिनेमे दुर्दैवाने लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले यातून पुढच्या पिढीने चांगला माणूस म्हणून आदर्श घ्यावा असे काहीही नाही. साऊथ इंडियन बाहूबली अवघ्या देशाने भव्यता पाहून उचलून धरला.
या उलट अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्या जीवनावरील सिनेमा चालतो पण तितक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर इतिहास घडेल. असे पत्रकारांशी संवाद साधताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले.
छत्रपतींच्या जीवनातील अशाच एका महत्त्वाच्या घटनेवर आधारित भव्यदिव्य सिनेमा शिवप्रताप गरुडझेप येत्या पाच ऑक्टोबर रोजी हिंदुस्थानातील तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जगदंब क्रिएशनने या सिनेमाची निर्मिती केली असून छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका डॉ अमोल कोल्हे यांनी साकारली आहे